Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

‍ चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
‍ चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मार्च १८, २०२३

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

चंद्रपूर:
 १,४१,०९५ रुपयांची थकबाकी असणाऱ्या सरकार नगर, राधिका सभागृहाजवळील व्हीजन कंपनीच्या टॉवरला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकाने कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठविल्यानंतर जे मालमत्ता धारक कराचा भरणा करण्यास दिरंगाई करत आहे त्यांच्या मालमत्तांवर सील लावण्यात येत आहे. याकरीता झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. १६ ते २६ मार्च दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत ५० टक्के सूट देण्यात येत असुन अधिकाधिक मालमत्ता धारकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले,अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,पथक प्रमुख नागेश नित,नरेंद्र पवार,अमित फुलझेले,चिन्मय देशपांडे,अमुल भुते,प्रगती भुरे,अतुल भसारकर,रवींद्र कळंबे,सोनू थुल,प्रतीक्षा जनबंधु,अतुल टिकले,सागर सिडाम,विकास दानव,चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.

  Hansraj Ahir, chairman of the National Commission for Backward Classes, has been given the status of Union Cabinet Minister

Hansraj Ahir, chairman of the National Commission for Backward Classes, has been given the status of Union Cabinet Minister


Chandrapur 
 The post of National Commission for Backward Classes Chairman Hansraj Ahir has been conferred the equivalent status of a Cabinet Minister through a letter issued by the Union Home Ministry. He was appointed as the Chairman of the National Commission for Backward Classes by His Excellency the President on December 02, 2022. Now this post has been given the status of Union Cabinet Minister.

After assuming the responsibility of the President, Hansraj Ahir has been working with great vigilance regarding the social, educational and employment issues of OBCs while reviewing the OBC officials, employees, workers in the government, semi-government, industries, various companies, coal mining sector in various states of the country to fill the backlog according to the roster. He has been effectively working as the National President for constitutional rights of OBCs.

Hansraj Ahir has previously represented Chandrapur Lok Sabha constituency 4 times. A member of the Maharashtra Legislative Council, during his tenure as an MP, he has done remarkable work as chairman and member of other Parliamentary Standing Committees including Coal and Steel. He has also effectively discharged the posts of Union Minister of State for Home Affairs and Minister of Fertilizers and Chemicals in the 16th Lok Sabha. Hansraj Ahir is being congratulated from all quarters for being conferred the status of Cabinet Minister.

सोमवार, जानेवारी २३, २०२३

स्वातंत्र्य लढ्यातील गुप्तहेर | azadi ka Amrit mahotsav special story

स्वातंत्र्य लढ्यातील गुप्तहेर | azadi ka Amrit mahotsav special story

स्वातंत्र्यलढ्यातील गुप्तहेर




Story by Deonath Gandate 
चंद्रपूर (Chanda) शहरात गोंडकालीन राजवट होती. मराठ्यांनी चंद्रपूर काबीज केलं. मराठे आणि इंग्रज यांच्यात झाले युध्द झाले आणि 20 मे 1818 रोजी चंद्रपूर किल्लाच्या पठाणुपरा गेटवर इंग्रजांचा ‘युनीयन जॅक’ (

Union Jack

) फडकला. सव्वाशे वर्ष हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात होतं.



हजारो देशभक्तांच्या बलिदानाने आणि त्यागाने भारत देश परकीयांच्या पारतंत्र्यातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त अमृत महोत्सव (azadi ka Amrit mahotsav) साजरा होत आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्य लढ्यातील योध्यांचे स्मरण होऊ लागले आहे. 

1945 च्या सुमारास भारताीयांमध्ये एक नवा उत्साह संचारला होता. त्यावेळी अनेकजण प्रत्यक्ष लढ्यात सहभागी होऊन तर काहीजण भूमिगत राहून देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी एकवटली होती. चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील श्री. विठ्ठल मंदिर व्यायामशाळेनं जणू लढवय्ये देशभक्त घडविले. याच व्यायामशाळेत श्री. बाबूराव बनकर Baburao Bankar ( जन्म १९३०) हे वयाच्या चौदाव्या वर्षीपासून जाऊ लागले होते. गडला मारुती मंदिराजवळ त्यांच घर होतं. घरची परिस्थिती अत्यन्त गरीब. पण घराण्याला पहेलवानीची वारसा लाभला होता. वडील बंधू सदाशिव, गणपती व विश्वनाथ उत्तम कुश्तीगीर. तेच बाळकडू बाबूराव यांना मिळाले. शरीर मुलायम. पण कसदार होते. दिसायला देखणा तरुण हनुमंताचा निःसीम उपासक. दर्शन घेतल्याशिवाय जेवन करायचे नाही, हा नित्यक्रम.



रक्ताने केली स्वाक्षरी अन घेतली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा
भारताच्या स्वातंत्र्य संग्राम आंदोलनात 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोची हाक दिली. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मण कृष्णाजी चासेकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र संग्राम सैनिक काशिनाथजी घटे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक सह. गो. कुचिनवार, गुरुवैर्य अमृतराव सिंगते नागपूरकर यांच्या मार्गदर्शनात पुरातन महाकाली मंदीराच्या गच्छीवर स्नेह सर्वधर्म मंडळाची 100 मुले जमली. स्वातंत्र्य लढ्याचा हा मार्ग खडतर होता. देशभक्तीने मंतरलेली ही मुलं एकत्र आली होती. गरीब, श्रीमंत, धर्म, पंथ, जाती हा भेदाभेद उरला नव्हता. "आम्ही देशाकरीता प्राण देण्यास तयार आहोत" असा प्रण सर्वानी केला. प्रत्येकाने रेजरच्या पानाने आपल्या हाताच्या बोटावर चिरा मारून रक्ताने कागदावर सह्या केल्या. तो कागद फुलाच्या हारामध्ये ओवून गुरुवर्य अमृतराव सिगते यांना घालून देश स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. गुरुवैर्याच्या पायावर हात ठेवून व त्यांच्या देशभक्तीच्या प्रेरनेने सर्वजण स्वातंत्र मिळेपर्यंत ब्रिटीश पोलीसाशी लढत राहिले. अनेकदा पोलीसांच्या लाठ्या सुध्दा खाल्या. या कालावधीत चिमूरचा बाघ म्हणून जेष्ठ स्वातंत्र सेनानी दशरु लक्ष्मण काहीलकर यांनी 1942च्या भारत छोड़ो आंदोलनात सक्रीय भाग घेतला. त्यावेळी ब्रिटीशांनी अनेकांना पकडले. ब्रिटीशांनी दशरु लक्ष्मण काहीलकर यांना 20 वर्षाची जन्मठेप ठोठावली.


स्वातंत्र्य लढ्यात सहभागी
१९४५ मध्ये अनेक नेत्यांना अटक झाली तरी चळवळी थंडावली नव्हती. कठोर शिक्षा हसतमुखाने झेलणारे देशभक्त तेव्हा होते. या काळात या सर्वांच आदर्श घेऊन बाबुराव बनकर हे देखील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिकांचे आदेश व मार्गदर्शनाखाली भुमीगत राहून काम सुरु केले. ज्या स्वातंत्र संग्राम सैनीकांना पोलीसानी अटक केली, अशा सर्वाच्या घरी जावून निरोप देणे, सभेची तयारी करणे, बातमी देणे, स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या सभेची तयारी करणे, गुप्त बातम्या शोधून काढणे, जे स्वातंत्र संग्राम सैनिक जेलमध्ये होते, त्यांच्या कुटूंबियाना मदत करणे, त्या कुटूंबाचे मनोधर्य टिकविणे, पत्रके वाटून समोरची दिशा ठरविणे, अशा प्रकारचे काम बाबुराव बनकर यांनी केले होते. 


भूमिगत संदेशवाहक 
बाबुराव गोविंदराव बनकर (Baburao Govindrav Bankar) हे यांना लहानपणापासूनच सामाजिक व देशसेवेने झपाटलेले होते. स्वातंत्र्य आंदोलनात सन १९४२ मध्ये त्यांनी भुमीगत राहून राष्ट्रभक्त सैनीकांये काम केले आहे. माहिती पत्रके वाटणे, गुप्त बैठकांची माहिती पोहचविणे, संदेश देणे आदी गुप्तहेराची कामे त्यांनी केली. यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊन त्यांना पुढील शिक्षणा पासून वंचीत व्हावे लागले. भूमिगत काम करीत असतानाही त्यांना इंग्रज पोलिसांनी अटक केली होती.  काही काळ ते जेलात होते. अखेर स्वातंत्र्याचे क्षण मखमली मुठीत घेऊन तो दिवस उगवला. १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. भारत स्वातंत्र झाल्यावर त्यांनी कुटुबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी गोल बाजारात किराणा दुकान सुरु केला. त्यांना ५ मुले आणि ३ मुली अशी अपत्य आहेत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी बाबुराव बनकर यांनी वयाची ९३ वर्षे पूर्ण केली आहेत. ते विठ्ठल मंदिर वॉर्डातील शांतीभवन निवासस्थानी कुटुंबीयासमवेत राहतात. स्वातंत्रानंतर त्यांनी अनेक वर्षे समाजसेवेत घालवली. आपल्या समाजाच्या भवनासाठी त्यांनी जमीन दान देखील केली. 



स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. त्याच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. मात्र संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही. आज स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे होत आहे, अशावेळी बलिदान आणि त्यागाचे विस्मरण न होता पुढील पिढीसाठी ते तेवत ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे बनकर यांचे ज्येष्ठ पुत्र दिवाकर बनकर (Diwakar Bankar) म्हणाले. दिवाकर हे अखिल भारतीय स्वतंत्र्य संग्राम सैनिक पाल्य संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. 


रविवार, जानेवारी ०८, २०२३

 औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

४१ किलोमीटरच्या स्पर्धेत उरतले राज्यभरातील हजारो धावपटू

 चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदार संघाचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा ९ जानेवारीला वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून माता महाकाली बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रविवारी ८ जानेवारीला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. रत्नमाला चौक (वरोरा) ते पडोली चौक अशा या ४१ किलोमीटरच्या स्पर्धेत राज्यभरातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. औरंगाबाद जवळील बेडेवाडी या गावी सुटीवर असलेल्या भारतीय जवानाने स्पर्धेत सहभाग नोंदवित एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
धानोरकर दाम्पत्याची ओळख राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे अशी आहे. त्यामुळे खासदार बाळूभाऊ धानोरकर असो वा आमदार प्रतिभाताई धानोरकर हे आपला वाढदिवस दरवर्षी साधेपणाने साजरा करतात. समाजातील गरजुंना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात स्वतः आनंद शोधतात. यावर्षीसुद्धा ताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरले. शारीरिक तंदुरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी वरोरा ते पडोली अशी ४१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर केला. सोशल मीडियावरून मॅरेथॉन स्पर्धेची माहिती मिळताच राज्यभरातील धावपटूंना स्पर्धेत आपल्या नावांची नोंदच केली नाही, तर स्वयंस्फूर्तीने सहभागीसुद्धा झाले. 
वरोरा येथील रत्नमाला चौक येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, इंटक नेते के. के. सिंग, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, माता महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे,  अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. सागर वझे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्ना अहिरकर, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वरोरा विधानसभा प्रमुख मोनू चिमुरकर, घुगुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी,  बाजार समिती माजी अध्यक्ष राजू चिकटे, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, पवन अगदारी, प्रमोद बोरीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे. सैय्यद अन्वर, रोशन दतलवार, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, यश दत्तात्रेय, कुणाल चहारे, शाफान शेख, पप्पू सिद्धीकी राहुल चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रल्हाद रामसिंग धनावत या भारतीय जवानाने २ तास १३ मिनिट ५२ सेकंदात ४१ किलोमीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकाविला. ५१ हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक महेश वाढई रा. चंद्रपूर, तृतीय पारितोषिक दीपक सिरसाट रा. नाशिक, चतुर्थ पारितोषिक अजित झा.रा. ठाणे , पाचवे पारितोषिक निखील सिंह रा. मुंबई, यांनी पटकाविले. या विजेत्यांना खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. 
--

आरोग्याची श्रीमंती सर्वश्रेष्ठ
आरोग्यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही. त्यामुळेच आरोग्य धनसंपदा म्हटले जाते. लाखो, कोट्यवधी रुपये असतील. परंतु, आरोग्यच चांगले नसेल, तर हे पैसा कोणत्या कामाचा. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य जपावे. दररोज सकाळी नियमित व्यायाम करावा. शारीरिक तंदूरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्याच्या उद्देशातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी झाले. त्या सर्वांचे अभिनंदन.
-खासदार बाळूभाऊ धानोरकर
  एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

उद्घाटनाच्या अगोदरच विद्युत चिमनी ला लागले जंग
स्मशानभुमी बनली कच-याच माहेरघर
चंद्रपूर - बाबूपेठ परीसरात असलेली एकमेव स्मशानभूमी जिथे बंगाली कॅम्प, अष्टभुजा, महाकाली कॉलरी, लालपेठ, आणि संपूर्ण बाबुपेठ परिसरातील जनता शवदहन करण्याकरिता या स्मशानभुमी मध्ये आणतात. अनेक वर्षापासून असलेल्या या स्मशानभूमी कडे मनपा प्रशासनाचे लक्ष न गेल्यामुळे येथे अनेक समस्या उद्भवत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे रोज अनेक शव दहन केले जाते. परंतु एकच शव दाहिनी असल्यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याकरिता चार शव दाहीनी ची तिथे व्यवस्था करावी. सोबतच येथील जागेवर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण होत आहे. तिथे संपूर्ण परिसराला वॉल कंपाऊंड करण्यात यावे. जंगलातून आलेला पाण्याचा झरा हा स्मशानभूमी मधून जात असून तो 12 महिने वाहत असतो तिथे आंघोळीकरीता ओटा, करून देण्यात यावा. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा मनपा सह प्रभारी राजु कुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.


गरज नसताना मनपा कडून खनीज निधीतून 1कोटी खर्च करून LPG शव दांहीनी स्मशान भूमी मध्ये बसवली गेली. ज्या मध्ये मागील दीड वर्षात एक ही शव दहन झाले नाही. ही तर जनतेचा पैशाची उधळपट्टी असून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. स्मशानभूमी संदर्भातील मागण्या पूर्ण करण्याकरीता 7 दिवसांत महत्त्वाचे पाऊले उचलली गेली नाही तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आवाहन आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी दिले. या वेळेला जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, कृष्णा सहारे, महेश ननावरे, भीमराज बगेसर, मुकुंद गटलेवार तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदैव तेली समाजा सोबत राहील - आ. किशोर जोरगेवार

सदैव तेली समाजा सोबत राहील - आ. किशोर जोरगेवार

तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर
उपवधु मेळावा व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोज
चंद्रपूर:
तेली हा धार्मीक आणि सामाजिक बांधीलकी जपणारा समाज आहे. समाजातील युवक हे प्रतिभावंत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आजच्या या उपवर - उपवधु मेळाव्याच्या माध्यमातुन समाज एकत्रीत आला आहे. यात समाजाच्या समस्या व प्रश्नांबाबत चिंतन व्हावे. हे प्रश्न आमच्या पर्यत्न पोहचावेत. ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबध्द असुन तेली समाजा सोबत होते आणि पुढे ही राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

माश्रोती सभागृह येथे तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर - उपवधू मेळाव व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, वेकोलीचे सिजीएम संजय वैरागडे, सिंदेवाही चे नगराध्यक्ष सुधिर कांबळे, तेली समाजाचे विदर्भ अध्यक्ष बाबुलाल शेंडे, महिला अध्यक्ष दुधलकर, सेवादल चे सुर्यकांत खनके, माजी नगरसेविका चंदा ईटनकर, छबु वैरागडे, प्राचार्य जर्नाधन दुधलकर, विनोद बुटले, आकाश साखरकर, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तेली युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी उपवर - उपवधु मेळाव्याचे आयोजन केल्या जात आहे. प्रत्येक समाजाने असे आयोजन नियमित केले पाहिजे. अशा आयोजनातून समाज एकत्रीत येतो. आजच्या धावपडीच्या युगात समाजातील योग्य वर वधु शोधण्यासाठीही असे आयोजन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. तेली समाज आपल्या पारंपरीक व्यवसायकडुन दुर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. नौकरीच्या शोधात राहा पंरतु त्या सोबतच स्वयंरोजगारातुन समाजाची आर्थिक प्रगती साधा असे आवाहणनही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील युवक युवतींना केले.
आपण सेवेकरी समाज आहोत. तेली समाजाने चंद्रपूर जिल्ह्याला अनेक मोठे नेतृत्व दिले आहे. या समाजातील युवक - युवती मागे राहता कामा नये, या समाजाच्या अडचणी सोडविण्याचे लोकप्रतिनीधी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यांना सभागृहासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतुन तयार होणार असलेले हे सभागृह समाजाच्या सामाजिक, धार्मीक कार्यक्रमासांठी उपलब्ध असणार आहे. तर बाबुपेठ येथे ही श्री संताजी यांच्या खुल्या मंचासाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा काही शेवट नाही. समाजाने पुन्हा कुठे गरज असल्यास तशी मागणी करावी निधी आम्ही देऊ असेही यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले.

सामाजिक आणि धार्मीक क्षेत्रात तेली समाज बांधवाचे मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक कार्यात पूढे असणारा हा समाज आहे. समाजातील युवकांमध्ये समाजकार्याची आवड आहे. वधू.- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचे काम समाजाच्या वतीने केल्या जात आहे असल्याचे ते यावेळी म्हणाले . या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

शहरात थर्टीफर्स्टच्या पर्वावर चंद्रपूर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरु

शहरात थर्टीफर्स्टच्या पर्वावर चंद्रपूर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरु

थर्टीफर्स्ट साजरे करा,मात्र जरा जपून!
चंद्रपूर:
३१ डिसेंबर शांततेत व अपघातमुक्‍त ठेवण्यासाठी जिल्हयात मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्द ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविले जात आहे.

जिल्हयात दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशथनचा जोर चांगला रंगणार आहे. यावर्षी पोलीस विभागातर्फे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे काही उपाय योजना राबविण्यात येत असुन त्यांपैकी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिमे सुरुवात करण्यात आली आहे.

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन उत्साहाच्या भरात गैरकृत्य करणाऱ्या मद्यप्रेमी, दारुच्या नशेत गाडी  चालवणे, विना परवाना मद्य सेवन करणे, दंगा मस्ती, गोंधळ घालणे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मद्यपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच या पार्श्वभुमीवरुन जिल्हयात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २८ डिसेंबर २०२२ पासुनच जिल्हयात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविली जात आहे. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी नाकाबंदी, ब्रिथ अनालायझर मशिनच्या मदतीने मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपीची तपासणी करण्यात येत असुन दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी राबविलेल्या मोहिमेत अनेक केसेस करण्यात आल्या आहेत.

 सदर मोहिम ही कारवाई करण्यासाठी नाही तर फक्‍त अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविली जात आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, ३१ डिसेंबर उत्साहात साजरा करावा परंतु सेलिब्रेशनच्या नावांखाली मद्य प्राशन करुन मोटार सायकल व कार भरधाव वेगाने चालवुन/स्टंट मारुन अपघात घडवु नये किंवा अपघात होवू नये याची सर्वांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणुनच पोलीस विभागातर्फ ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिम सुरुवात करण्यात आली आहे.
 आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी करीता “'पोलीस काका-पोलीस दीदी” उपकम

आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी करीता “'पोलीस काका-पोलीस दीदी” उपकम


चंद्रपूर:
सद्याच्या बदल्या आधुनिक जिवनशैली मुळे सद्यस्थितीत शालेय व महाविद्यालयीन विधार्थी आणि विद्यार्थीनीना अनेक प्रकारच्या लैंगिक छळ, गुड टच-बॅड टच, चुकीचा स्पर्श, छेळछाडीचे घटना, टॉटींग-रॅंगिंग, डूग्स ईत्यादिचे व्यसनाधिनता, सायबर पाठलाग, सायबर गुन्हे आणि सर्व प्रकारच्या लैगिंक व शारिरीक हिंसाचार इत्यादी विविध धोक्यांचा सामना करावा लागत असल्याच्या अनेक उदाहरणे समोर येवु लागली आहेत. 

अशा समस्यांचे वेळी वेळीच योज्य प्रकारची मदत न केल्यास विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी कायमचे नुकसान होवु शकते. अशा नुकसानी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या “पोलीस काका-पोलीस दीदी'* अशा परिस्थीतीत त्यांना वेळीच आवश्यक ती मदत देत आहात. ज्यामुळे पोलीस-विद्यार्थी परस्पर विश्वास आणि विश्‍वासावर आधारित संबंध निर्माण होत आहेत. पोलीसांच्या वेळेवेर मदतीची उदाहरणे इतर विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करीत असुन “"पोलीस काका-पोलीस दीदी" हे विद्यार्थ्यचे संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणुन काम करीत आहे. 

मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी नागरीकांना पुनश्च: जागरुकतपर माहिती  देत आहे की, चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक शाळा/कॉलेज/मुलींचे वस्तीगृह ई ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस अंमलदार ““पोलीस काका-पोलीस दीदी” हे भेटी देवुन शालेय मुलींना गुड टच-बॅड टच, चुकीचा स्पर्श, सायबर गुन्हे, महिला व बाल सुरक्षा विषयक माहिती व मार्गदर्शन करुन त्यांना त्यांचे संपर्क कमांक तसेच चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ कमांकाबाबत माहिती देवुन संकटाचे वेळी पोलीस मदती करीता त्यांचेशी संपर्क करण्याबाबत कळविण्यात येत आहे. पोलीस काका-पोलीस दीदी?' या योजनाचे समन्वयक अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाढीवे हे काम पाहत आहे.

दिनांक २८/१२/२०२२ रोजी पासुन पुनश्च: जिल्हयातील विविध पो.स्टे.हद्दीतील शाळांना नव्याने नेमणुक करण्यात आलेले “पोलीस काका-पोलीस दीदी” यांनी अनेक शाळांमध्ये भेट देवुन मुलांच्या गाठीभेटी घेवुन त्यांचेशी संवाद साधत आपले मोबाईल कमांक दिले असुन यापुढे सदर उपकम नियमित राबविण्यात येणार आहे.

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

विदर्भातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार...

विदर्भातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार...

                   ८ नोव्हेंबरला वर्षातील शेवटचे ग्रहण 

          

        नुकतेच २५ ओक्टोंबरला खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेम्बर ला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ % आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम  भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चन्द्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वा  चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वा ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल.  अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली. #Grahan2021 #Chandragrahan2021 #Lunareclipse2021

       विदर्भातून ग्रहण-  विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वा चन्द्रोदयातच ग्रहणाला सुरवात होईल.इथे चंद्र ७० % पृथ्वीच्या सावलीने झाकाळला दिसेल.चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता ग्रहण दिसेल.येथे  ६० % भाग ग्रस्तोदित असेल,ग्रहण मध्यकाळ लगेच ०५.३५ वा तर ग्रहण अंत ०७.२६ वाजता होईल.पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल.शेवटी बुलढाना येथे ०५.४५ वाजता ग्रहणाला सुरवात होईल आणि अंत ०७.२६ वाजता होईल.येथे १ तास ४१ मिनिटे ग्रहण दिसेल आणि चंद्र २५ % ग्रस्तोदित असेल.सर्व ठिकाणी चंद्र क्षितिजावर १० डिग्री वर आल्या नंतरच चांगले ग्रहण पाहता येईल.

     ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया ,उत्तर-दक्षिण  अमेरिका,येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही.उर्वरित  देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारताबाहेर ८ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी ०१.३२ वा छायाकल्प चन्द्रग्रहनाला सुरवात होईल.०२.३९ वा खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल, ०३.४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होईल तर ०५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ०६.१९ वा खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वा छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. .ग्रहणाचा छायाकल्प काळ ०२.१४ तास ,खंडग्रास काळ ०२.१५ तास , खग्रास काळ ०१.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ०५.५४ तास असेल.भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल.आणि ०७.२६ वा.ग्रहण संपेल.पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग) लहान होत जाईल. 

      सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास,काही भाग आल्यास खंडग्रास (penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते.दरवर्षी दोन तरी चन्द्रग्रहणे होतात.२०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण,५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण,१४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८,२९,/ऑक्टो २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे.पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.ग्रहणे हा केवळ उन्ह-सावल्यांचा खेळ असून त्याबधल  अंधश्रद्धा मानने अगदी चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे.सर्व नागरिक आणि विध्यार्थ्यांनी ग्रहनांचा वैद्न्यानिक दृष्ट्‍या अभ्यास केला पाहिजे.चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही.पूर्व दिशेला क्षितिज दिसेल अश्या मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जावून साध्या डोळ्याने किंवा लहान द्वीनेत्री/बायनोकुलरने ग्रहण पहावे. 

    भारतातील ग्रहण वेळा -भारतात अरुणाचल प्रदेशातून ०४.२३ वा जवळ जवळ खग्रास स्थितीतच चंद्रोदय होईल आणि ३ तास ग्रहण दिसेल, कोलकाता येथून ०४.५२ वा.२.३४ तास दिसेल,पटना येथून ०५.०० वा २.२५ तास दिसेल,वाराणसी येथून ०५.०९ वा.०२.१६ तास दिसेल,लखनऊ येथे ०५.१५ वा २.१० तास दिसेल,दिल्ली येथे ०५.३१ वा. १.५८ तास दिसेल,बिकानेर येथे ०५.५७ वा १.४१ तास दिसेल तर भूज येथून ०६.१० वाजता आणि सर्वाधिक कमी काळ (१.१८ तास) ग्रहण दिसेल.

  महाराष्ट्रातील ग्रहनाच्या वेळा- ह्या खालील वेळा चंद्रोदयाच्या आहेत,ग्रहण क्षितिजावर चंद्र आल्यानंतर दिसेल. गडचिरोली येथून ग्रहणाला ०५.२९ वा सुरवात होईल आणि ०७.२६ वा ग्रहण संपेल, येथे सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे ग्रहण दिसेल आणि ग्रस्तोदित चंद्र ७०% दिसेल.चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता, नागपूर येथे ०५.३२ वाजता ,यवतमाळ येथे ०५.३७ वा., अकोला येथे ०५.४१ वा ,जळगाव येथे ०५.४६ वा., औरंगाबाद येथे ०५.५० वा ,नाशिक येथे ०५.५५ वा.,पुणे येथे ०५.५७ वा .,मुंबई येथे ग्रहण ०६.०१ वाजता सुरु होऊन ०७.२६ वा ग्रहण संपेल.समुद्र किनारी भागात महाराष्ट्रात सर्वात कमी काळ म्हणजे १ तास २५ मिनिटेच ग्रहण दिसेल.( खालील कोष्टकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील ग्रहनांचा काळ-वेळ दर्शविला आहे,एकाच कोष्टकात असलेल्या अनेक शहरांत अक्षांस/रेखांका नुसार दोन/तीन सेकंदाचा फरक राहील ह्याची नोंद घ्यावी. ह्या शहराच्या जवळील सर्व तालुका आणि ग्रामीण भागात ह्याच वेळा असतील  )

६/११/२०२२                                               

                                               प्रा सुरेश चोपणे 

                                       खगोल अभ्यासक , अध्यक्ष- स्काय वाच ग्रुप 

                                   फोन-९८२२३६४४७३ , smchopane@gmail.com

                 

खालील पानावर तक्ता दिला आहे -------

                  कुठे ,केव्हा ,किती काल ग्रहण दिसेल 

    शहर 

ग्रहण सुरवात 

ग्रहण मध्य- 

अंत - टक्के  

एकूण काळ

गडचिरोली

गोंदिया,भंडारा   

०५.२९ 

०५.३३ 

०७.२६ वां       (७०%)  

१.५६ तास 

चंद्रपूर ,नागपूर 

०५.३२ 

०५.३४ 

-,-    ६०%

१.५४ तास

वर्धा,यवतमाळ 

०५.३७ 

०५.३९ 

--    ५५ % 

१.४९ तास 

अमरावती,अकोला,

नांदेड,परभणी 

०५.३८ 

०५.४० 

--    ५०%

१.४८ तास 

जळगाव,औरंगाबाद 

बीड  

०५.५० 

०५.५७ 

-- २५ % 

१.३६ तास 

सोलापूर 

०५.५८ 

०६.००

-- २० %  

१.२८ तास 

धुळे,मालेगाव

अहमदनगर 

०५.५३ 

०५.५७ 

-- १७ %

१.३३ तास 

पुणे,नाशिक,कोल्हापूर

सांगली,सातारा  

०५.५७ 

०५.५९ 

--१५ %

१.२९ तास 

मुंबई,अलिबाग,

गोवा,रत्नागिरी 

०६.०१ 

०६.०३

--१२ %

१.२५ तास 


                      #Grahan2021 #Chandragrahan2021 #Lunareclipse2021

ग्रहण असे दिसेल

संबंधित शोध