पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील कुंभारटोळीतून जाणाऱ्या नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर काही मुले पतंग उडवित होते. शुक्रवारी दुपारी वंशसुद्धा तेथे पतंग उडवित होता. पतंग लुटण्याच्या नादात वंशचे वेगाने येणाऱ्या रेल्वेकडे लक्ष गेले नाही आणि वेगाने येणाऱ्या यशवंत एक्सप्रेसचे वंशला जबर धडक बसली. यात वंशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नागपूर येथे 7 जानेवारी २०२१ रोजी पतंग (Kite) पकडण्यासाठी जगाचं भान विसरुन धावणाऱ्या एका बारा वर्षाच्या मुलाचा रेल्वेच्या (Train) खाली चिरडून मृत्यू झाला होता. एंटा सोळंकी असं या मृत मुलाचं नाव होत. एंटा पंतग पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. त्यावेळी त्या ट्रॅकवरुन रेल्वे येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही, आणि ही चूक त्याला महागात पडली.