सोमवार, जुलै १८, २०२२
धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू
रविवार दिनांक 17. 7.2022 ला कारंजा येथील आठवडी बाजारात विद्युत प्रवाह आणि रात्री आठच्या दरम्यान दोन आईचा जागीच मृत्यू झाला. रविवारला कारंजा येथे आठवडी बाजार भरत असतो. त्या निमित्याने भाजीपाल्याचा व्यापार करणारे व्यापारी आपले पाल ठोकून भाजीचा व्यवसाय करीत असतात.
तालुक्यातून बरेच ग्रामीण भागात नागरिक बाजार करण्यासाठी कारंजाला येतात. आठवडी बाजारात व्यापाराची पाल टाकून व्यवसाय करीत असताना पाल लावण्याचा खिळा जमिनीच्या वायरिंग वर ठोकल्या गेल्या मुळे बाजूला विद्युत पोल असल्यामुळे त्या पोलची वायरिंग जमिनीतून असल्यामुळे त्या वायरिंगवर त्या तालपत्रीचा खिळा आल्यामुळे त्या लोखंडी रॉडला करंट आला रात्रीचे लाईट त्या पोल वरील सुरू असल्यामुळे रात्री आठवडी बाजारात गाई फिरत होत्या.
आणि त्या ताडपत्रीच्या रॉडला गाईचा स्पर्श झाला आणि त्या गाईला करंट लागून जागीच मृत्यू झाला. त्याच प्रमाणे दुसरी गाय सुद्धा त्या गाई जवळ गेली तिचा पण जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळेस नागरिक जर त्या दुकानाजवळ गेले असते तर मोठी जीवित हानी झाली असती बोलल्या जात आहे.
weekly market Karanja, electrocution and death
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
