१८ जून २०२२
Home
Unlabelled
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप.
नवेगावबांध दि.१८ जून:-
अर्जुनीमोर तालुक्यात सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या काळात पाच शेतकरी आत्महत्या झाल्या.या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहायता निधी मधून शासनातर्फे मदत देण्यात आली.तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या विधवांना धनादेशाचे वितरण तहसील कार्यालयात करण्यात आले. तालुक्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यामध्ये सावरटोला येथील आसाराम तुकाराम चचाणे,कानोली येथील मोरेश्वर पंढरी रहिले,परसटोला येथील परसराम येशू हलामी, केशोरी येथील संतोष दयाराम मानकर आणि एरंडी येथील यशवंत बारकू राऊत या शेतकऱ्यांचा समावेश आहे.राज्य शासनाकडून मासिक बचत योजनेच्या माध्यमातून ७० हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचा धनादेश या स्वरुपात मृतकांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची सहायता मंजूर झाली. या सहायता निधीचे वाटप तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते मृतांच्या वारसांना तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले.यावेळी मृतकांची वारसान शारदा चचाने,सुनीता रहिले,गीता हलामी, वंदना मानकर आणि सुमित्रा राऊत उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
