२० मे २०२२
दोन ट्रकच्या धडकेत भीषण आग; 9 जणांचा मृत्यू
चंद्रपूर शहराजवळील अजयपूर जवळ 2 ट्रक ट्रकच्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत 9 जण जळल्याची माहिती पोलिसांनी दिली. 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. आज सकाळी झालेल्या चौकशीत 9 मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले.
धडके नंतर 2 दोन ट्रकने भीषण पेट घेतला. त्यामुळे चंद्रपूर मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
एक ट्रक हा डीझल टँकर तर दुसरा लाकडाने भरला होता. त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले होते. अग्निशमन पथकाला सुद्धा घटनास्थळी पोहचायला 1 ते दीड तास लागला. त्यामुळे वाचविण्यात यश आले नाही. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की या अपघातात जळालेले 9 मृतदेह मिळाले आहेत. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
The fire broke out in both the trucks; four deaths
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
