Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

गुरुवार, मार्च १७, २०२२

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय यमदूत; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा







खापरखेडा-प्रतिनिधी
खापरखेडा परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २४७ परिसरात मोठया प्रमाणात अपघात वाढले आहेत यात अनेकांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत मात्र संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून उपाययोजना नावालाच आहेत त्यामूळे राष्ट्रीय महामार्ग व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संलग्न खापरखेडा पत्रकार संघाने ग्रामिण पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली असून पोलीस निरीक्षक हृदयनारायण यांच्या मार्फत १७ मार्च रोजी त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग २४७ चे कंत्राट सरस्वती कन्ट्रक्शन नामक कंपनीला देण्यात आले मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम संहिते नुसार राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम झाले नसल्यामूळे अपघाताची मालिका वाढली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिनियमा प्रमाणे शाळा महाविद्यालय गाव, आदि परिसरात शौचालय, रिप्लेक्टर, सर्व्हिस रोड, सूचना फलक, कठडे, आदि लावणे अनिवार्य आहे मात्र कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत मागील काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिचोली सर्कलच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले यावेळी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश ठाकरे यांनी लिखित आश्वासन दिले याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता किरण मून हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते मात्र अंमलबजावणी करण्यात आली नाही.

राष्ट्रीय महामार्ग २४७ परिसरात योग्य सोयी सुविधा देण्यात आल्या नसल्यामूळे अपघातांचा ग्राफ वाढला आहे राष्ट्रीय महामार्ग परिसरातील पथदिवे बंद राहत असल्यामूळे खापरखेडा पोलीस ठाण्या समोर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा बळी नाहक गेला आहे शिवाय अनेकांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील एक महिन्यापासून रेल्वे क्रॉसिंग ते मनोरंजन गृह क्रमांक १ परिसरातील पथदिवे बंद आहेत त्यामूळे "अंधेरा कायम रहेगा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शिवाय भानेगाव उड्डाणपूला वरील पथदिवे सारखे बंद आहे त्यामूळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे शिवाय सुसाट वेगाने पळत सुटणारे वाळू व कोळसा भरून निघणारे ट्रक अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग व संबंधित कंपनीची आहे मात्र या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असून या सर्व प्रकाराला राष्ट्रीय महामार्ग व संबंधित अधिकारी जबाबदार आहे.
त्यामूळे संबंधितावर भांदवि ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सहआरोपी करण्याची मागणी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न खापरखेडा पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.


यावेळी खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर, सरचिटणीस कपिल वानखेडे, जिल्हा प्रतिनिधी अमर जैन, दिवाकर घेर, बंडूभाऊ चौरागडे, पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार प्रदीप खांबलकर, मनोज डेव्हिड, डॉ विनोद गौतम, गिरधारी शर्मा, सुरेश वानखेडे, राजेश खंडारे, विनोद गोडबोले, राज तांडेकर अमोल कळंबे, याच्यासह विविध राजकीय पक्षाचे सुमेध चव्हाण, श्यामराव नागरकर, क्रीष्णा बर्वे, प्रकाश बाळापूरे, ईश्वर चिकनकर, विक्की थापा, संदीप ठाकरे, मंगेश चोरपगार आदि उपस्थित होते.


Yamadoot is becoming a national highway; Charge the authorities with culpable homicide

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.