२१ मे २०२१
स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता : दिलीप पनकुले
स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील व युवकाचे प्रेरणास्थान असलेले महान नेते होते. भारतासारख्या प्रगतीशील देशात राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचा बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही असे मनोगत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्य राजीव गांधी चौक (अजनी चौक) वर्धा रोड येथे स्थापन केलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला श्रद्धांजली वाहताना दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बलिदान दिन साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, प्रदेश सेवादल कार्याध्यक्ष जानबा मस्के, भाईजी मोहोड प्रल्हाद वरोकर, श्रावण हर्षे, प्रशांत लांडगे रामभाऊ धुर्वे, बबलू चौहान, मंदार हर्षे, मच्छिंद्र आवळे, विजय मसराम, सूरज बोरकर, राजेश टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
