पुराणात वर्णन केलेले हे हेमाडपंथी मंदिर वाठार-बोरपाडळे राज्य मार्गावर तळसंदे येथील चावरे फाट्याच्या विरुद्ध दक्षिण बाजूच्या रोडवर दोन फर्लांग अंतरावर भव्य असा गावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी श्री महाविष्णू यांची शेषशाही रूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाशी भारत कन्या व कन्याकुमारी (शक्ती, आदिशक्ती) अशा दोन मूर्ती आहेत. पराशरासह अन्य अनेक ऋषिमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे. मंदिराचे बांधकामच हेमाडपंथी आहे. यावरून हे मंदिर पुरातन मंदिरात मोडते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, पुराणातील एवढा पुरावा देखील पुष्कळ आहे. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी दगडी शिळेचा पूल होता. तो काळाच्या ओघात पडला आहे. त्याचे एक-दोन टप्पे शिल्लक आहेत. मंदिराची उत्तर व दक्षिण बाजूची पूर्ण भिंत कोसळली आहे.आतील एका बाजूचा थरच कसाबसा अजून तग धरून आहे. मूर्तीचा कालावधी लक्षात घेतला, तर कित्येक वर्षांची ही मूर्ती जीर्ण होत चालली आहे.उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना येथे जाता येते.एरवी पाणी असल्याने काही भक्त पोहत जाऊन सेवा पार पाडतात. गावातील लोक या तलावातील पाण्याचा वापर खर्चासाठी, अंघोळ व जनावरे धुण्यासाठी करतात.
तळसंदे येथील श्री महाविष्णू मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून देखील विकास करता येण्यासारखा आहे. तलावात नौका विहाराची सुविधा निर्माण केली तर उत्तम निसर्ग पार्कमुळे गावच्या विकासासाठी उत्त्पन्नाचे साधन होईल. मूर्तीचे संवर्धन करणे,भाविकांना कायम स्वरूपी जाता यावे यासाठी पूल बांधणे,अशी अनेक कामे तातडीने केली पाहिजेत.
या पुराणातील प्रसिद्ध व अध्यात्मात मोठे महत्त्व आहे. जिल्ह्यात श्री महाविष्णूची मंदिरे फार कमी आहेत. अशातच शेषशाही मंदिरांची संख्या दुर्मीळ आहे.दुसरे विष्णु मंदिर कुरुंदवाड येथे आहे.पण ते अलिकडील काळातील असावे.तळसंदे येथील मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे.