आश्चर्यकारक पुस्तक! या पुस्तकाची आोळ उलटसुलट वाचली तर दोन कथा
____________________________
"राघवयादवीयम्" नाव या करता की राघव म्हणजे श्रीराम व यादव घराण्यातले श्रीकृष्ण होय.
हा ग्रंथ १७ व्या शतकामध्ये कांचीपुरमच्या वेंकटाध्वरी यांनी
लिहिला.
या ग्रंथामध्ये ३० श्लोक आहेत, जे सरळ वाचले तर रामाची कथा सांगतात आणि उलटे वाचले तर कृष्णाची कथा सांगतात. याप्रमाणे या ग्रंथाचे उलट आणि सुलट असे दोन्ही श्लोक पकडले तर एकूण या ग्रंथामध्ये ६० श्लोक आहेत.
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,मी भगवान रामांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना प्रणाम करतो, ज्यांच्या हृदयामध्ये सीता देवीचा वास होता. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरांकडे प्रस्थान केले, ते लंकेला पोहचले, त्यांनी रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून ते अयोध्येला परत आले. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ग्रंथाचा पहिला उलटा श्लोक खाली दिल्या प्रमाणे आहे.
सेवाध्येयो रामालालीगोप्याराधी मारामोरा।यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देहं देवं ।। १ ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,मी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो, ज्यांना रुक्मिणी आणि गोपिका पूजत होत्या. लक्ष्मी देवी त्यांच्या हृदयामध्ये वास करते आणि प्रत्येकवेळी त्यांच्याबरोबर विराजमान असते. तसेच त्यांचे सौंदर्य हे सर्व दागिन्यांच्या सौंदर्यापेक्षा सुरेख आहे.
वर एक नमुनादाखल उदाहरण दिले आहे.या ग्रंथातील कोणताही श्लोक घ्या, तुम्हाला श्री कृष्ण आणि श्री राम यांची कथा वाचण्यास मिळेल.
हा ग्रंथ गुगलवर उपलब्ध आहे.