किल्ले राजदेहरे
डोंगररांगेत ‘‘राजदेहेर‘‘ किल्ला आहे. हा दूर्गम गड दोन डोंगरावर वसलेला असून त्यामध्ये असलेल्या घळीतून
किल्ल्याचा प्रवेश ठेऊन स्थापत्यकाराने किल्ल्यावर चालून येणारा शत्रू दोनही डोंगरावरुन मार्याच्या टप्प्यात राहिल अशी योजना केलेली आहे. या पूरातन किल्ल्यावर आजही पहाण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भागपेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव यांच्याकडे सोपवून १०
हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला.
इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.
१५ एप्रिल १८१८ रोजी कर्नल प्रॉथर याच्या नेतृत्वाखालील सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ला निकम देशमुखांच्या ताब्यात होता. मराठा सैन्याने प्रतिकार केला, पण इंग्रजांनी किल्ला जिंकून
घेतला.
त्याच्या बाजूलाच नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत.
तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका पहायला मिळतात. तेथून माचीवर निमूळत्या टोकापर्यंत गेल्यावर आजूबाजूचा विस्तृत प्रदेश व राजधेरवाडी गाव पहाता येते. माचीच्या टोकावरुन बालेकिल्ल्याकडे जाताना डाव्या हातास पाण्याच एक टाक आहे.
बालेकिल्ल्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गडाच्या दक्षिणेला थोडी तटबंदी शाबूत आहे बाले किल्ल्यावरुन उतरुन ही तटबंदी ओलांडून गडाला वळसा घालूनही राजधेरवाडीत उतरता येते.
२) मनमाड - नांदगाव रेल्वेमार्गावर नायडोंगरी
स्थानकावर उतरावे (येथे केवळ पॅसेंजर थांबतात).
नायडोंगरी येथुन राजदेहेर वाडीला जाण्यासाठी बसेस मिळतात. राजदेहेरवाडी पासून २ किमीवर महादेव मंदिर आहे. या मंदिरा जवळून किल्ल्यावर जाणारी पायवाट ♏गडावर रहाण्याची सोय ,जेवणाची सोय नाह