Top News
झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन Anniversary of Zadiboli Sahitya Mandal
श्रीमती पगडपल्लीवार यांच्या वृंदावन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गोंडपिपरी (प्रतिनिधी) - झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनाच...

ads
सोमवार, मार्च २७, २०२३
ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या | BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI
ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या
ग्रामीण विकासाचा संपूर्ण गाडा हाकण्याची जबाबदारी पंचायत समिती विभागाची आहे. मात्र सदोष कार्य प्रणाली व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दिरंगाई धोरण यामुळे ग्रामीण नागरिकांना याचा प्रचंड ना हा त्रास सहन करावा लागत असून अनेकांची कामे रिंग आलेली असल्याची वस्तुस्थिती आज आमसभेत निदर्शनास आली. विकासाचा गाडा हाकणाऱ्यांकडून कर्तव्यात तीळ मात्रही कुचराई नको अशी तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर आयोजित आमसभेत पशुसंवर्धन व पंचायत विभागावर नागरिकांनी प्रचंड ताशेरे ओढले. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)
आज ब्रह्मपुरी येथील रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रह्मपुरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आयोजित सभेस अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उषा चव्हाण, गटविकास अधिकारी संजय पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी घुबडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोणबले, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, माजी पं. स. सदस्य थाणेश्वर कायरकर, मानापुरे, विलास उरकुडे,सरपंच उमेश धोटे, सोनू नाकतोडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
आयोजित वार्षिक साधारण सभेत मागील वर्षी सन 2021- 22 या आर्थिक वर्षाचा कार्य अहवाल वाचन करण्यात आला सोबतच सन 2022 -23 चा अहवाल सादर करताच विविध विभागाच्या कार्यप्रणालीवर सदोषतेचा थपका ठेवत नागरिकांनी आमसभेत तक्रारीचे वादळ निर्माण केले. यावर सभाध्यक्ष माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यप्रणाली बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तसेच पंचायत विभागाच्या विकास कामा संदर्भातील अहवाला बाबत दिशाभूल करणारे अहवालपत्रक सादर केल्याने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोबतच नागरिकांच्या समस्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली. ग्रामीण भागात विकासाचा दुवा म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. ही जबाबदारी पेलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्नातून विकासाचा गाडा हाकलत ग्रामीण भागाचा विकास साधावा असे होत नसल्यास कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईतून त्यांना मिळणारे वेतन भत्ते ही थांबवण्यात येईल अशा प्रकार शब्दात माजी मंत्री आमदार वडिटीवर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांची दुधाळू गाय पशुसंवर्धन विभागाच्या निष्काळजीपणाची बळी ठरली. आज आमसभेत हे प्रकरण चांगलेच गाजले. तर शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला असता पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यात मेंडकी येथील पशुसंवर्धन विभागाचे पर्यवेक्षक राजहंस मेश्राम यांच्या निष्काळजीपणा व सदोष कार्यप्रणाली यावर ठपका ठेवत वेतन वाढ रोखण्यात चे आदेश सभाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.
ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल Dr. Anil Bonde
विर सावरकारांच्या अपमानाचा मुद्दा पेटला
नागपूर, दि.27 मार्च
स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मारला, आता राहूल गांधी यांनी विर सावरकरांना पुन्हा ‘माफीविर’ म्हटल्याने राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत ठाकरे पितापुत्रांना गर्भीत इशारा देत खडा सवाल केलाय. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हिंमत आहे का, राहूल गांधी यांना जोड्याने बडविण्याची असा सवाल त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे माजी खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा विर सावरकर यांना माफीवर म्हटल्याने देशातील वातावरण चांगलेच पेटल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत यविषयार सोमवारी (ता.27) भाष्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांनी वि.दा.सावरकर यांचा अपमान केला होता. तेव्हा अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा बाळासाहेब ठाकरे यांनी लगावला होता. आता काँग्रेसच्या राहूल गांधी यांनी सावरकरांना पुन्हा माफिवीर म्हटले आहे. त्यामुळे डॉ.अनिल बोंडे यांनी बाळासाहेबांच्या त्या कृतीचा संदर्भ व टाईम्स आॅफ इंडियाच्या वृत्ताचा हवाला देत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुत्र आदित्य ठाकरे यांना उद्देशून खडा सवाल केला आहे. ठाकरे पितापुत्रांमध्ये आहे का हिंमत की ते राहूल गांधी यांना जोड्याने बडवतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जी हिंमत होती ती हिंमत यांनी सत्तेच्या लाचारीपोठी गमावली आहे. देशातील जनता विचारत आहे, ज्या स्वातंत्र्य सैनिकाने अनन्वित अत्याचार सहन केले. त्याच्याबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या राहूल गांधी यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जोडे मारतील का, संजय राऊत तर शेपटी आतमध्ये घेऊन बिळात लपलेलसे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडू जनतेने अपेक्षा सोडल्याची गंभीर टिका देखील डॉ.अनिल बोंडे यांनी करत राहूल गांधी यांच्यासोबत बोलणी करायला जाण्यात काहीही अर्थ नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.
ब्लॉगिंगच्या माध्यमातून करू शकता करिअर : डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे | Pritam Nagrale blogger mykhabar24
माय खबर २४ डिजिटल मीडिया युनिक प्लॉटफॉर्मचा शुभारंभ
![]() |
डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे |
नागपूर । बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घालून ब्लॉगिंग केल्यास चांगली करिअर करू शकते, अशी माहिती प्रसिद्ध डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे यांनी दिली. ( Pritam nagrale, blogger, affiliate marketer, business owner)
नागपुरातील नंदनवन येथील एका हॉटेलमध्ये रीबुस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेट (Reboost My Khabar24 Private Limited) या युनिक प्लॉटफॉर्मच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डिजिटल मीडियाची अफाट ताकद आणि व्याप्ती, म्हणजे डिजिटल नेटवर्क. ही आजच्या काळात एक मोठी शक्ती म्हणावी लागेल. या ताकदीचा उपयोग योग्य कारणासाठी झाला तर डिजिटल मीडियातून क्रांती होऊ शकते. याच कल्पनेतून MY KHABR 24 डिजिटल मीडिया आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू झाले. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीवेंस कौन्सिलचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ अड. फिरदोस मिर्झा यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रसिद्ध सिनेकलावंत राजेश चिटणीस, प्रज्वल भोयर यांची उपस्थिती होती.
![]() |
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ अड. फिरदोस मिर्झा |
![]() |
राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे |
![]() |
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम |
उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर गणेशवंदना नृत्य सादर करण्यात आले. या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश रिबूस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर प्रितम मडावी यांनी स्पष्ठ केली.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपला शुभेच्छा संदेश दिला. पाहुण्यांच्या हस्ते रिमोट दाबून शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी विशेष सहकार्यासाठी निर्मय इंफ्राटेक ग्रुपचे संस्थापक नयन घाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर सोहळ्याचे अध्यक्ष अड. फिरदोस मिर्झा यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी, आभार माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर कृष्णा शेंडे मानले. आयोजनासाठी ऋतिक अलाम, भूपेंद्र शेंडे, स्वप्नील मडावी, जितेंद्र शेंडे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
देवनाथ गंडाटे यांचा विशेष सत्कार
डिजिटल मीडियातील पत्रकारांना आणि त्यात काम करणाऱ्यासाठी मार्गदर्शन करणारे नुकतेच प्रकाशित झाले. डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने (Digital Media Sandhi Aani Avhane) या पुस्तकाची अवघ्या महिनाभरात १ हजार पुस्तकांची विक्री झाली. डिजिटल मीडियातील योगदानासाठी पुस्तकाचे लेखक देवनाथ गंडाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शनिवार, मार्च २५, २०२३
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार; चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ Shri Ram Janmabhoomi
एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन
28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
प्रदूषण कमी करा, पिकांची नुकसानभरपाई द्याआमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी
सभापतींनी दिले बैठक घेण्याचे निर्देशआमदार सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यांसदर्भात तातडीने बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर, मंत्री दीपक केसरकर यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी, सिमेंट कारखाने यासह अन्य दोन अशी एकूण चार ठिकाणे निर्धारित करून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानभरपाईसंदर्भात तातडीने चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले
शुक्रवार, मार्च २४, २०२३
या कारणामुळे गेली राहुल गांधींची खासदारकी
दसऱ्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने नॅचरल स्टार नानी नागपुरात पोहोचले Natural star Nani reached Nagpur
गुरुवार, मार्च २३, २०२३
आठ दिवसांपासून बेपत्ता दोघांचेही मृतदेह सापडले; मृत तरुण महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नेत्याचा पुतण्या
धक्कादायक । मंदिरात पडला रक्ताचा सडा; दोघांची हत्या | Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand
मंदिरात दोघांची हत्या जखमी दरॊडेखोर दान पेटी घेऊन पसार https://t.co/3OE0PXMqI5 https://t.co/gpy3SoJUui
— खबरबात™ | 𝐊𝐡𝐚𝐛𝐚𝐫𝐛𝐚𝐭™ (@khabarbat) March 23, 2023