Top News

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन Anniversary of Zadiboli Sahitya Mandal

श्रीमती पगडपल्लीवार यांच्या वृंदावन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गोंडपिपरी (प्रतिनिधी) -  झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनाच...

ads

सोमवार, मार्च २७, २०२३

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन Anniversary of Zadiboli Sahitya Mandal

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन Anniversary of Zadiboli Sahitya Mandal



श्रीमती पगडपल्लीवार यांच्या वृंदावन काव्यसंग्रहाचे प्रकाशन

गोंडपिपरी (प्रतिनिधी) -
 झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनाचे आयोजन खैरे कुणबी समाज भवनात करण्यात आले होते. उद्घाटन राजुरा नगरपरिषद चे माजी अध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी उद्धव नारनवरे होते तर सत्कारमूर्ती म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे (गुरनोली) उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चारूदत्त मेहरे (अकोला), ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , गोंडपिपरी च्या नगराध्यक्ष सौ. सविता कुळमेथे, प्राचार्य सौ. रत्नमाला भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडीबोलीचे‌ जिल्हा प्रमुख अरुण झगडकर यांनी केले. तर कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांनी आपल्या वृंदावन काव्यसंग्रहाच्या निर्मितीवर प्रकाश टाकला. 



 यावेळी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अतिथीच्या हस्ते करण्यात आले. वृंदावन अभंग काव्यसंग्रहात मानवी जीवनाविषयी चिंतन मांडले गेले आहे, असे चारूदत्त मेहरे म्हणाले तर संत विचारांना समर्पित असा हा अभंग संग्रह असल्याचे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. अरूण धोटे यांनी झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. खुणे यांचा मंडळाचे वतीने मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. झाडीपट्टी रंगभूमी च्या सेवेसाठी मिळालेला सन्मान मी तमाम रसिकांना अर्पण करतो असे प्रतिपादन डॉ. खुणे यांनी केले. तसेच तालुक्यातील उद्धव नारनवरे, गोंडपिपरी (नाट्यकर्मी),राजेश्वर आत्माराम कोहपरे, वढोली (नाट्यकलावंत),पत्रुजी किसन सांगडे, धाबा (प्रवचनकार),झावरुजी बुधाजी फुलझेले, बोरगाव (नाट्यकलावंत),ओमाजी पाटील पिंपळकर, विठ्ठलवाडा (दंडार),दयानंद लिंबाजी सिडाम, गोंडपिपरी (नाट्यकलावंत) इत्यादी ज्येष्ठ झाडीपट्टी लोक कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. झाडी गौरव गीताचे गायन शाहिर नंदकिशोर मसराम (कुरंडी)यांनी केले तर सूत्रसंचालन रत्नाकर चौधरी यांनी केले . दुसऱ्या सत्रात कवयित्री सौ. गायत्री शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.‌या कवी संमेलनात दिलीप पाटील, विनायक धानोरकर, अनिल आंबटकर, लक्ष्मण खोब्रागडे, संजीव बोरकर, उपेंद्र रोहणकर, डॉ. प्रविण किलनाके , संगीता बांबोळे, प्रीती जगझाप, सुनील बावणे, शीतल कर्णेवार, सुनील पोटे, मनीषा मडावी, संतोष मेश्राम, सरीता गव्हारे, छाया टिकले, संतोषकुमार उईके, प्रशांत भंडारे, देवानंद रामगिरकर, अरुणा जांभूळकर, प्रमिला हांडे, अक्षय उराडे, दिनकर सोनटक्के आदी कवींनी आपल्या स्वरचित रचना प्रस्तुत केल्यात. सूत्रसंचालन रामकृष्ण चनकापुरे यांनी केले.‌
ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या  | BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या | BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या 


ग्रामीण विकासाचा संपूर्ण गाडा हाकण्याची जबाबदारी पंचायत समिती विभागाची आहे. मात्र सदोष कार्य प्रणाली व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दिरंगाई धोरण यामुळे ग्रामीण नागरिकांना याचा प्रचंड ना हा त्रास सहन करावा लागत असून अनेकांची कामे रिंग आलेली असल्याची वस्तुस्थिती आज आमसभेत निदर्शनास आली. विकासाचा गाडा हाकणाऱ्यांकडून कर्तव्यात तीळ मात्रही कुचराई नको अशी तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर आयोजित आमसभेत पशुसंवर्धन व पंचायत विभागावर नागरिकांनी प्रचंड ताशेरे ओढले. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)


आज ब्रह्मपुरी येथील रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रह्मपुरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आयोजित सभेस अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उषा चव्हाण, गटविकास अधिकारी संजय पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी घुबडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोणबले, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, माजी पं. स. सदस्य थाणेश्वर कायरकर, मानापुरे, विलास उरकुडे,सरपंच उमेश धोटे, सोनू नाकतोडे, प्रामुख्याने उपस्थित होते. 

आयोजित वार्षिक साधारण सभेत मागील वर्षी सन 2021-  22  या आर्थिक वर्षाचा कार्य अहवाल वाचन करण्यात आला सोबतच सन 2022 -23 चा अहवाल सादर करताच विविध विभागाच्या कार्यप्रणालीवर सदोषतेचा थपका ठेवत नागरिकांनी आमसभेत तक्रारीचे वादळ निर्माण केले. यावर सभाध्यक्ष माजी मंत्री तथा  आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यप्रणाली बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तसेच पंचायत विभागाच्या विकास कामा संदर्भातील अहवाला बाबत दिशाभूल करणारे अहवालपत्रक सादर केल्याने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोबतच नागरिकांच्या समस्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली. ग्रामीण भागात विकासाचा दुवा म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. ही जबाबदारी पेलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्नातून विकासाचा गाडा हाकलत ग्रामीण भागाचा विकास साधावा असे होत नसल्यास कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईतून त्यांना मिळणारे वेतन भत्ते ही थांबवण्यात येईल अशा प्रकार शब्दात माजी मंत्री आमदार वडिटीवर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)


ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांची दुधाळू गाय पशुसंवर्धन विभागाच्या निष्काळजीपणाची बळी ठरली. आज आमसभेत हे प्रकरण चांगलेच गाजले. तर शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला असता पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यात मेंडकी येथील पशुसंवर्धन विभागाचे पर्यवेक्षक राजहंस मेश्राम यांच्या निष्काळजीपणा व सदोष कार्यप्रणाली यावर ठपका ठेवत वेतन वाढ रोखण्यात चे आदेश सभाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.

ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल Dr. Anil Bonde

ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल Dr. Anil Bonde

 विर सावरकारांच्या अपमानाचा मुद्दा पेटला

ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल


नागपूर‍, दि.27 मार्च
स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मारला, आता राहूल गांधी यांनी विर सावरकरांना पुन्हा ‘माफीविर’ म्हटल्याने राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत ठाकरे पितापुत्रांना गर्भीत इशारा देत खडा सवाल केलाय. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हिंमत आहे का, राहूल गांधी यांना जोड्याने बडविण्याची असा सवाल त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा विर सावरकर यांना माफीवर म्हटल्याने देशातील वातावरण चांगलेच पेटल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत यविषयार सोमवारी (ता.27) भाष्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांनी वि.दा.सावरकर यांचा अपमान केला होता. तेव्हा अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा बाळासाहेब ठाकरे यांनी लगावला होता. आता काँग्रेसच्या राहूल गांधी यांनी सावरकरांना पुन्हा माफिवीर म्हटले आहे. त्यामुळे डॉ.अनिल बोंडे यांनी बाळासाहेबांच्या त्या कृतीचा संदर्भ व टाईम्स आॅफ इंडियाच्या वृत्ताचा हवाला देत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुत्र आदित्य ठाकरे यांना उद्देशून खडा सवाल केला आहे. ठाकरे पितापुत्रांमध्ये आहे का हिंमत की ते राहूल गांधी यांना जोड्याने बडवतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जी हिंमत होती ती हिंमत यांनी सत्तेच्या लाचारीपोठी गमावली आहे. देशातील जनता विचारत आहे, ज्या स्वातंत्र्य सैनिकाने अनन्वित अत्याचार सहन केले. त्याच्याबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या राहूल गांधी यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जोडे मारतील का, संजय राऊत तर शेपटी आतमध्ये घेऊन बिळात लपलेलसे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडू जनतेने अपेक्षा सोडल्याची गंभीर टिका देखील डॉ.अनिल बोंडे यांनी करत राहूल गांधी यांच्यासोबत बोलणी करायला जाण्यात काहीही अर्थ नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.
 ब्लॉगिंगच्या माध्यमातून करू शकता करिअर : डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे | Pritam Nagrale blogger mykhabar24

ब्लॉगिंगच्या माध्यमातून करू शकता करिअर : डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे | Pritam Nagrale blogger mykhabar24

माय खबर २४ डिजिटल मीडिया युनिक प्लॉटफॉर्मचा शुभारंभ

Pritam nagrale, blogger, affiliate marketer, business owner
 डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे

नागपूर । बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घालून ब्लॉगिंग केल्यास चांगली करिअर करू शकते, अशी माहिती प्रसिद्ध डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे यांनी दिली. ( Pritam nagrale, blogger, affiliate marketer, business owner)

रीबुस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेट (Reboost My Khabar24 Private Limited)

नागपुरातील नंदनवन येथील एका हॉटेलमध्ये रीबुस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेट (Reboost My Khabar24 Private Limitedया युनिक प्लॉटफॉर्मच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  


डिजिटल मीडियाची अफाट ताकद आणि व्याप्ती, म्हणजे डिजिटल नेटवर्क. ही आजच्या काळात एक मोठी शक्ती म्हणावी लागेल. या ताकदीचा उपयोग योग्य कारणासाठी झाला तर डिजिटल मीडियातून क्रांती होऊ शकते. याच कल्पनेतून MY KHABR 24 डिजिटल मीडिया आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू झाले. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीवेंस कौन्सिलचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ अड. फिरदोस मिर्झा यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रसिद्ध सिनेकलावंत राजेश चिटणीस, प्रज्वल भोयर यांची उपस्थिती होती.

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ अड. फिरदोस मिर्झा
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ अड. फिरदोस मिर्झा 

राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे
राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे
वेगवेगळी आव्हान पेलणाऱ्या माध्यमांसमोर खास करून डिजिटल मीडियासमोर विश्वसनीयता जपण्याचे मोठे आव्हान आहे. एकदा जनतेचा विश्वास संपादन केल्यास यशाच्या शिखराकडे झेप घेेणे कठीण नाही. त्यामुळे डिजिटल मीडियातील पत्रकारांनी आधी विश्वास जिंकावा, असा हितोपदेश राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केला. 

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम


उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर गणेशवंदना नृत्य सादर करण्यात आले. या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश रिबूस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर प्रितम मडावी यांनी स्पष्ठ केली.  

त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपला शुभेच्छा संदेश दिला. पाहुण्यांच्या हस्ते रिमोट दाबून शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी विशेष सहकार्यासाठी निर्मय इंफ्राटेक ग्रुपचे संस्थापक नयन घाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर सोहळ्याचे अध्यक्ष अड. फिरदोस मिर्झा यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी, आभार  माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर कृष्णा शेंडे मानले. आयोजनासाठी ऋतिक अलाम, भूपेंद्र शेंडे, स्वप्नील मडावी, जितेंद्र शेंडे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.


देवनाथ गंडाटे यांचा विशेष सत्कार 

डिजिटल मीडियातील पत्रकारांना आणि त्यात काम करणाऱ्यासाठी मार्गदर्शन करणारे नुकतेच प्रकाशित झाले. डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने (Digital Media Sandhi Aani Avhane) या पुस्तकाची अवघ्या महिनाभरात १ हजार पुस्तकांची विक्री झाली. डिजिटल मीडियातील योगदानासाठी पुस्तकाचे लेखक देवनाथ गंडाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शनिवार, मार्च २५, २०२३

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार; चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ Shri Ram Janmabhoomi

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार; चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ Shri Ram Janmabhoomi

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहुन 29 मार्च रोजी जाणार काष्ठ



देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार*
*• वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र*



मुंबई,दि. 25मार्च 2023 :
चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.


श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे Shri Ram Janmabhoomi महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि.5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्यामहाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे.


निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना.श्री. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती.


 ना. श्री. मुनगंटीवार यांनी या विषयात व्यक्तीश: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरीता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधीकाऱ्यांना दिल्या.
सागवानचे हे काष्ठ दि.29 मार्च 2023 रोजी विधीवत पूजा करून आणि शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने ना. श्री. मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. Shri Ram Janmabhoomi 


लाकडावर करणार नक्षीकाम व कोरीवकाम
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानचे हे काष्ठ ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शुभहस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.
असा असेल काष्ठपूजन सोहोळा
चंद्रपूर जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होता.अशा या चंद्रपूरमधून देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे.त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा दोन भागात होणार असून दि. 29 मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.4 वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.


ही शोभायात्रा सायं .6 वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ 9 पर्यंत चालेल.
या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवार आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत.Shri Ram Janmabhoomi 


प्रत्येक चौका चौकात विविध कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रंगोळ्यांनी सजविण्य़ात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनीं गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत.


या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तीपिठे” हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहेत. 
काष्ठ वाहून नेणाऱ्या रथाच्या भोवती कलकारांचे रिंगण राहिल. हा चित्ररथ श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर ही शोभायात्रा चांदा चौकात संपन्न होईल. 
शोभायात्रेनंतर रात्री 10 ते 12 या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्य़ात आला आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील.
या काष्ठ पूजन सोहॊळा आणि शोभायात्रेत दूरदर्शनच्या रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेकरिता योगगुरू श्री.स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गुरू श्री जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येत आहे. 
ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व खासदारांना आणि आमदारांना तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना या भव्य काष्ठपूजन सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री आणि खासदार व आमदार यांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले आहे. 
या काष्ठपूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे.
देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनरूभारणीत अनेकांचे हात लागले आहे आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे, अशी भावना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षिदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.
एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभागी 
होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर:
 भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार, उद्योजकांना सहभागी होण्याकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तसेच विविध कंपन्या व उद्योजकांना सहभागी होण्यासाठी www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून या लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

रोजगार मेळावा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्या करीता उमेदवारांना एन.एस.डी.सी.च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधित उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोनमध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लड, युरोप, पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकित उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यामध्ये ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी, लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर आदी क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉब फेअरची प्रक्रिया व कालावधी
स्क्रीनिंग व भाषा चाचणीचा ऑनलाइन दिनांक 20 ते 27 मार्च 2023, उमेदवाराची ऑनलाइन मॅपिंग दि. 28 मार्च ते 10 एप्रिल 2023, तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि. 11 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 ते 15 मे 2023 कालावधीत पार पडणार आहे. समारोपीय समारंभ दि.26 मे 2023 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2 हजार उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एन.एस.डी.सी.मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरीता एनएसडीसीच्या व्यवस्थापक पंघोरी बोरगोएन यांच्या 9599495296 भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


चंद्रपूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती 
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-चंद्रपूर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 28 ते 31 मार्च 2023 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
  प्रदूषण कमी करा, पिकांची नुकसानभरपाई द्याआमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी

प्रदूषण कमी करा, पिकांची नुकसानभरपाई द्याआमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी

चंद्रपूर : 
जिल्ह्यातील उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. परंतु, संबंधित यंत्रणेकडून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांत चंद्रपूर शहर व जिल्ह्यात प्रदूषणाच्या समस्येने गंभीररूप धारण केले आहे. यामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत केली आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर शहराच्या सुमारे २५ किलोमीटरच्या परिसरात सर्वाधिक उद्योगधंदे आहेत. यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, कोलवॉशरिज, एमआयडीसी, स्पॉन्ज आयर्न, सिमेंट कारखाने यांचा समावेश आहे. या उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास या उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना शद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे. यासोबतच प्रदूषणामुळे परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे.

परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार अडबाले यांनी केली आहे.

सभापतींनी दिले बैठक घेण्याचे निर्देश
आमदार सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यांसदर्भात तातडीने बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर, मंत्री दीपक केसरकर यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी, सिमेंट कारखाने यासह अन्य दोन अशी एकूण चार ठिकाणे निर्धारित करून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानभरपाईसंदर्भात तातडीने चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले

शुक्रवार, मार्च २४, २०२३

या कारणामुळे गेली राहुल गांधींची खासदारकी

या कारणामुळे गेली राहुल गांधींची खासदारकी




राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. सुरत न्यायालयाने कालच त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भातील अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारीच राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Congress party's Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha from the date of his conviction in the criminal defamation case over his 'Modi surname' remark, March 23.




2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींवर मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. ज्याच्या विरोधात गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.यासंदर्भात लोकसभा सचिवालयाकडून सात ओळींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, केरळमधील वायनाड येथील लोकसभा सदस्य राहुल गांधी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी, सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरले आहेत. ही अपात्रता त्याच्या दोषी ठरल्याच्या दिवसापासून म्हणजेच 23 मार्च 2023 पासून लागू होईल. हा निर्णय राज्यघटनेच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 मधील तरतुदींनुसार घेण्यात आला आहे.
दसऱ्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने नॅचरल स्टार नानी नागपुरात पोहोचले Natural star Nani reached Nagpur

दसऱ्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने नॅचरल स्टार नानी नागपुरात पोहोचले Natural star Nani reached Nagpur




नॅचरल स्टार नानी त्यांच्या दसरा (on the occasion of Dussehra promotion) चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले नागपुरात पोहोचले.सुपरस्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत.लखनऊमध्ये स्पेक्टॅकुलर एन्ट्री केल्यानंतर आणि आता या अभिनेत्याने ट्रॅक्टरवर येऊन नागपुरातील सर्व चाहत्यांना थक्क केले आहे.दसरा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून नानीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटासाठी लोक नानीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आता तिची क्रेझ नागपूरकरांमध्येही पाहण्यासारखी होती.

श्रीकांत ओडेला लिखित आणि दिग्दर्शित दसरा हा सिंगारेनी कोळसा खाणींची सामाजिक आर्थिक स्थिती, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता संघर्ष यातून प्रेक्षकांना घेऊन जातो. एक विलक्षण कथानक आणि काही उत्कृष्ट अभिनयाची अपेक्षा असलेला हा चित्रपट शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटाच्या उत्कंठावर्धक आणि उर्जेने भरलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांना मनोरंजनाची झलक दिली कारण सुपरस्टारची भूमिका कौतुकास पात्र आहे "देशभरातील लोकांकडून इतके प्रेम मिळणे खूप छान वाटते. महाराष्ट्राने आमचे खूप प्रेमळ स्वागत केले आहे आणि मी नागपुरात आल्याचा मला आनंद आहे."


सुधाकर चेरुकुरी और श्रीकांत चुंडी द्वारा निर्मित 'दसरा' में नानी, कीर्ति सुरेश, दीक्षित शेट्टी, शाइन टॉम चाको, समुथिरकानी, साई कुमार नज़र आयेंगे। श्रीकांत ओडेला द्वारा लिखित और निर्देशित, संतोष नारायणन द्वारा संगीतबद्ध और सथ्यन सूर्यन आईएससी द्वारा छायांकन के साथ, यह फिल्म 30 मार्च को अपने बड़े राष्ट्रव्यापी रिलीज के लिए तैयार है।


गुरुवार, मार्च २३, २०२३

आठ दिवसांपासून बेपत्ता दोघांचेही मृतदेह सापडले; मृत तरुण महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नेत्याचा पुतण्या

आठ दिवसांपासून बेपत्ता दोघांचेही मृतदेह सापडले; मृत तरुण महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नेत्याचा पुतण्या

माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतण्या आणि त्याच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आठ दिवसापूर्वीच बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपुरात देण्यात आली होती.



The nephew of former Union Minister Hansraj Ahir and one more person were found hanging in Chandigarh after the two went there from their native Chandrapur in Maharashtra more than a week ago.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार, सध्या मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे (NCBC) अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतण्या महेश हरिश्चंद्र अहिर आणि त्यांचे मित्र हरीश धोटे आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चंद्रपूरहून चंदीगडला गेले होते. त्यानंतर कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क करू शकले नाहीत. “कुटुंबातील सदस्यांनी 15 मार्च रोजी चंद्रपूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी एक पथक चंदीगडला पाठवले. बुधवारी संध्याकाळी चंदीगडमध्ये अहिर आणि धोटे यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. चंडीगडच्या सेक्टर ४३ मधील बसस्थानकासमोर सापडले. (आयएसबीटी-४३) सेक्टर ५२ अंतर्गत कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेतला होता. त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे.



महेश हरिश्चंद्र अहीर (वय २४, रा. कोतवाली वॉर्ड जलनगर चंद्रपूर) आणि हरीश प्रदीप धोटे (२७, रा. बालाजी वॉर्ड चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
दोघांचे नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी चंदीगडला रवाना झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला असून तो चंद्रपूरला आणण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्यावर शांतीधाम येथील स्मशानभूमी अंत्यविधी केला जाईल.
दरम्यान ही घटना आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

The bodies of both, missing for eight days, were found

Mahesh Harishchandra Ahir and his friend Harish Dhote, both in their mid-20s, had gone to Chandigarh eight days ago.
धक्कादायक । मंदिरात पडला रक्ताचा सडा; दोघांची हत्या |  Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand

धक्कादायक । मंदिरात पडला रक्ताचा सडा; दोघांची हत्या | Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand

*भद्रावती तालुक्यातील मांगली येथील घटना

शिरीष उगे (भद्रावती -प्रतिनिधी)
 भद्रावती तालुक्यातील मांगली येथे अज्ञात व्यक्तींनी जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडून तिथे राहणाऱ्या दोघांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand

काल रात्री मांगली शेत मालक बापूजी खारकर ७० वर्ष व सहकारी मधुकर खुजे ७१ वर्ष हे शेतातील जगन्नाथ बाबा मंदिर येथे झोपले असताना काही दरोडेखोरांनी सर्व प्रथम झोपेत असलेल्या बापूजी व मधुकर यांच्यावर लोखंडी सब्बलीने वार करून दोघांची हत्या कण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटी घेऊन पसार झाले. ही हत्या लोखंडी सब्बल ने केली आहे. दरोडे खोर दान पेटी घेऊन पसार झाले. दानपेटीत किती रक्कम होती याबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हजर असून पोलीस तपास सुरू आहे. आहे. जिह्यात गुन्हेगारी चा ग्राफ वाढत असताना पोलिसांना आणखी या घटनेने चिंताग्रस्त केले आहे. दुहेरी खूनाच्या या घटनेने गाव हादरून गेले आहे. पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी असून आरोपीचा मागोवा घेतला जात आहे.





शेतकऱ्यांच्या हत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले विधानसभेत मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या मांगली परिसरामध्ये शेत शिवारात असलेल्या मंदिरात झोपी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या दृष्टीने आलेल्या या दरोडेखोरांनी शेतकऱ्यांची हत्या केली असून त्यांचा तपास तातडीने करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भद्रावती वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत केली आहे. 

भद्रावळी तालुक्यातील मांगली परिसरामध्ये जगन्नाथ बाबा मंदिर आहे शेतकरी बापूजी खारकर आणि त्याचे सहकारी मधुकर खोजे हे वयोवृद्ध असून दोघेही मंदिरात झोपले होते मंदिरात दानपेटी चोरीसाठी आलेल्या दरोडेखोरांनी या दोघांची हत्या केली या घटनेमुळे भद्रावती मतदारसंघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे लक्ष वेधले. या दरोडेखोरांची तातडीने चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

brutal-killing-of-two-farmers-in-jagannath-baba-math-in-bhadravati-taluka